५ आयुर्वेदिक उपाय जे तुमचे शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवतील

५ आयुर्वेदिक उपाय जे तुमचे शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवतील

निरोगी आहाराचे पालन करणे कठीण वाटू शकते, परंतु निरोगी जीवन जगणे महत्वाचे आहे. शारिरीक हालचालींसोबत पौष्टिक आणि संतुलित आहार हा उत्तम आरोग्याचा पाया आहे.

निरोगी आहारामध्ये उच्च दर्जाची प्रथिने, कर्बोदके, हृदयासाठी गुड फॅट्स, जीवनसत्त्वे, खनिजे आणि पाणी यांचा समावेश होतो.

आजकाल व्यस्त वेळापत्रकामुळे लोक त्यांच्या आरोग्याकडे योग्य लक्ष देऊ शकत नाहीत. यामुळेच आजकाल लोकांना आरोग्याच्या छोट्या-मोठ्या समस्यांनी घेरले आहे.

पण जोपर्यंत तुमची प्रकृती चांगली नाही, तोपर्यंत तुमचे मनही प्रसन्न असणार नाही.

मन आणि प्रकृती या दोन्हींच्या आरोग्याचे संतुलन राखणे हे आयुर्वेदसचे प्रयोजन आहे.

आयुर्वेदाचे आपल्या जीवनात महत्व

आयुर्वेद म्हणजे “जीवनाचे विज्ञान”. आयुर्वेदिक औषधी ही जगातील सर्वात जुन्या औषधशास्त्रां पैकी एक आहे. आयुर्वेद हे भारतात ३००० वर्षांपूर्वी विकसित झाले होते.

बदलत्या जीवनशैलीत चटकन आराम मिळण्यासाठी आपण वेगवेगळ्या ‘पॅथी’ वापरतो. परंतु असाध्य रोग मुळापासून नष्ट करण्यासाठी आयुर्वेद चिकित्सा पद्धती हा रामबाण उपाय आहे.

याद्वारे अनेक आजार टाळता येतात, तर काही आजार आटोक्यात आणता येतात.

1. ताजी हवा आणि काही आसने

योगासने केल्याने कोणत्याही प्रकारचे रोग, वेदना, तणाव, निद्रानाश दूर व्हायला मदत होते. व्यस्त वेळापत्रकामुळे योगासने करायला वेळ मिळत नसेल तर सूर्यनमस्कार करून तुम्ही तंदुरुस्त राहू शकता.

तुमच्या पचनसंस्थेलाही निरोगी राहण्यासाठी ताजी हवा लागते. सकाळी फिरायला जाणे किंवा निसर्गात फिरायला जाणे हे पचन संस्थेचे आजार असल्यास. फायदेशीर ठरते.

2. पौष्टिक नाश्ता

शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी फक्त व्यायाम आवश्यक नाही. त्यासाठी पौष्टिक आहाराचीही गरज असते.

जर तुम्हाला तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल. हेल्दी ब्रेकफास्ट घेणे अगदी गरजेचे आहे.

3. योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन

तुमच्या शरीराला अन्नाच्या कितीतरी पट जास्त पाण्याची गरज असते. तुम्हाला माहिती आहे का, पाणी शरीराला डिटॉक्सिफाई करण्यास, कॅलरीज बर्न करण्यास आणि अकाली अन्नाची लालसा कमी करण्यास मदत करते.

निरोगी राहण्यासाठी दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पण रोज सकाळी घेतलेले एक ग्लास कोमट पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

रोज सकाळी एक ग्लास गरम पाणी प्यायल्याने स्थूलता कमी व्हायला मदत होते, तसेच गरम पाणी प्यायल्याने पचनशक्ती सुधारते.

4. योग्य वेळी आणि योग्य आहार घेणे

योग्य वेळी अन्न खा आणि जेवणात एकच प्रकार खा. यामुळे तुमच्या पोटाशी संबंधित समस्या उद्भवणार नाहीत. अर्थातच काही आहारतज्ञांची याबाबत वेगवेगळी मते आहेत. याशिवाय नेहमी जमिनीवर बसून अन्न खावे.

आयुर्वेदानुसार जमिनीवर बसून अन्न खाल्ल्याने अनेक आजारांपासून संरक्षण मिळते. तुमच्या आहारात पुरेशा भाज्या आणि फळे असणे तुमच्या पचनसंस्थेसाठी आवश्यक आहे.

5. डिटॉक्सिफिकेशन

आरोग्यासाठी शरीरातील विषाचा निचरा होणे आवश्यक आहे. अन्न, हवा, पाणी यांचे प्रदूषण, मानसिक ताण आदींमुळे आपल्या शरीरात अनेक प्रकारची विषद्रव्ये साठतात.

आरोग्य राखण्यासाठी या विषांचा निचरा होणे आवश्यक असते. आयुर्वेदात यासाठी निर्विषीकरण प्रक्रियेला महत्त्व आहे. निर्विषीकरण प्रक्रियेतून पचनसंस्था सुद्धा स्वच्छ ठेवली जाते.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!