सुप्त मन आणि त्याची शक्ती वापरून आरोग्य कसे सुधारता येईल?

मित्रांनो, जागृत मन आणि सुप्त मन यांची शक्ती वापरून यशस्वी होण्याचं तंत्र… या लेखाला आपण भरभरुन प्रतिसाद दिलात, त्याबद्द्ल मनःपुर्वक धन्यवाद! त्याच लेखाचा हा उत्तरार्ध!

आपल्या शरीरातली अर्ध्याहुन अधिक आजारांच्या मागे आपलं सुप्त मन असतं. पण कित्येकदा पेशंटला याची माहीती नसते. डॉक्टरांकडे गेलं आणि उपचार घेतले की तात्पुरतं बरं वाटतं, थोड्या दिवसांनी पुन्हा दुखणं, उफाळुन येतं, काय करावं, ते समजत नाही.

मन आणि शरीर यांना जोडणारी काही लक्षणे बघुया

1) एखाद्या गोष्टीची जबरदस्त भिती किंवा चिंता वाटली की घशाला कोरड पडते.

2) परिक्षेचा किंवा अजुन कसला तणाव असेल तर पोटात गोळा येतो.

3) समोर एखादा अपघात किंवा दुर्घटना पाहीली की हातापायातली शक्ती गळुन जाते.

4) आणि याविपरीत सतत हसतमुख असणारी व्यक्ती नेहमी क्वचितच आजारी पडते.

तर हे सिद्ध झाले आहे की, आपल्या शरीरातल्या आंतरिक क्रियांवरही सुप्त मन आपली सत्ता चालवते. जसं की, समोर मातीचे कण उडाले की सेकंदाच्या दहाव्या भागात लगेच पापण्या मिटतात. सुप्त मन शक्तीशाली आहे पण एखाद्या सेनापतीसारखं, त्याच्यावर सत्ता चालते विचारांची!

ताकतवर असला तरी तो गुलामच! दिलेला आदेश पाळणं एवढचं त्याचं काम! आपण जे काही बोलतो तेच आपले विचार आहेत. आता आपण सुप्त मन आणि विविध आजार यातली अदृश्य तार बघू…

१) ब्लडप्रेशर आणि ह्रद्यविकार

समजा एखादा माणुस, नकळत, अशी वाक्ये पुन्हा पुन्हा वापरत असेल, जसं की….

1) त्याला बघितलं की माझं रक्तचं खवळतं!

2) ह्यांच्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं, आणि हे बदलले!

3) माझी तळपायाची आग मस्तकाला जाते!

क्वचित अशी वाक्ये वापरली गेली, तर हरकत नाही, पण पुन्हा पुन्हा हेच बोलल्यास आणि ते सुप्त मनात गेल्यास त्याचा विपरीत परीणाम रक्ताभिसरणावर नक्कीच होतो.

डॉक्टरकडे गेल्यावर औषध-उपचाराने काहीकाळ बरं वाटतं, पण अज्ञात मन त्याचा पिच्छा सोडत नाही. ही सर्व वाक्य सतत तणावात असणार्‍या व्यक्तीच्या सवयीचा भाग बनतात आणि लवकरच त्याला ब्लडप्रेशर आणि मोठ्या स्वरुपाचे हृदयाचे विकार घेरण्यास सुरुवात करतात.

थोडक्यात सतत मानसिक तणाव, हताशा आणि निराशा अनुभव करणारा व्यक्तीला हृदयरोग लवकर घेरतात.

२) आतड्यांचे विकार

जो व्यक्ती स्वतःलाच घालुन पाडून बोलतो, स्वतःची निंदा करतो, स्वतःला दुबळा समजतो, त्याला छोट्या आतड्यांच्या विकरांची समस्या उदभवते.

३) अपचन

बहुसंख्य लोक ह्या आजाराने त्रस्त आहेत, खरतरं मलविसर्जन ही अतिसहज आणि नैसर्गिक क्रिया आहे, तरीही काही जणांना ‘धक्का देण्यासाठी’ कृत्रिम उपायांचां, जसं की एखादे चुर्ण किंवा एखादं औषध ह्यांचा सहारा घ्यावा लागतो.

आता ह्याची बरीचशी कारणं आहेत, इथे एका उदाहरणची चर्चा करुयात.

काही वेळा ह्याचं कारण बाल्यावस्थेत दडलेलं सापडतं, कडक शिस्तीच्या नादात आई वडीलांनी मुलाला एखादी शिक्षा केलेली असते, त्याचा राग त्याच्या मनात असतो, लहान मुल आईवडीलांवर राग काढु शकत नाही.

त्याला त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकावीच लागते, त्यांना विरोध म्हणुन ही क्रिया तो रोखुन धरतो. ह्या ठिकाणी आई वडील त्याला जबरदस्ती करु शकत नाहीत, हळुहळु तो मोठा होतो, शिस्तीचा बडगाही संपतो पण आपल्या आतड्यांवरचं नैसर्गीक नियंत्रण तो हरवुन बसतो.

असं ही बघण्यात आलं की जेव्हा व्यक्ती आर्थिक संकटात सापडते, तेव्हा तिची पचनशक्ती कमजोर झाली होती. जे लोक कंजुष वृत्तीचे होते, त्यांच्यामध्ये मुळव्याध्याची समस्या जास्त आढळली.

४) जठर आणि पित्ताशयाचे विकार

छोट्याछोट्या गोष्टींवरही एखादी व्यक्ती वारंवार उत्तेजित होते, चिडते, अस्वस्थ होते, त्याचा परीणाम जठर आणि पित्ताशयावर पडतो.

५) डोकेदुखी

आजकाल बहुतांश भगिनीवर्गाला झंडुबाम शिवाय झोप येत नाही. कारण काय असेल बरं?

1) ह्या व्यक्तीला बघितलं की माझं डोकं दुखतं!

2) त्याने माझं खुप डोकं खाल्लं!

3) आमच्या ह्यांच्यासमोर कितीही डोकं फोडा, काही फायदा नाही,

निरंतर, नकळत असं बोलत राहील्याने अज्ञ मनात संदेश पोहचतो की माझ्या डोक्याला दुखायचे आहे. आणि मायग्रेनचा त्रास चालु! डोकेदुखीची अजुनही काही कारणे आहेत, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी अप्रिय घटना घडलेली असतेच, पण तिला मनातल्या मनात पुन्हा पुन्हा तिला उगाळण्याचा स्वभाव असेल तर डोकेदुखी सुरु होते.

तेव्हा असे कटु अनुभव विसरुन जाणेच इष्ट! कधी नकोसे वाटणारे काम, त्रासदायक काम अंगावर येऊन पडते, आणि डोके दुखते. जितके पोस्टपोर्न केले तेवढा त्रास होतो, तेव्हा अशी कामे तात्काळ निपटुन काढावीत.

६) पाठदुखी

एखादा व्यक्ती सतत जबाबदारीच्या ओझ्याने वाकुन थकुन गेला असेल तेव्हा त्याला पाठदुखीला सामोरं जावं लागतं. असह्य वेदना होतात, ह्यात मानेपर्यंतचे स्नायु आखडले जातात.

त्यांच्यवरचा ताण जाणवतो. चेहरा मुळ स्थानी न राहता उजवीकडे किंवा डावीकडे कलतो.

आता सर्वात महत्वाचे, ह्यावर उपाय काय आहे?

आपापले औषधौपचार चालु ठेवा पण हे रोग शरीरातुन समुळ उपटुन काढायचे असतील तर स्वयंसुचना हाच ह्यावरचा एकमेव उपाय आहे.

जसं की डोकेदुखीचं उदाहरण घेऊ…… तंद्रावस्थेत जाऊन आपल्या अज्ञात मनाला सुचना द्या….

आता माझं डोकं एकदम हलकं हलकं होत आहे,

आता ते अजुन शिथील आणि हलकं झालं आहे,

डोके दुखण्याचे प्रमाण कमी होत आहे,

माझ्या डोक्यात जमा झालेलं अतिरीक्त रक्त आता शरीराच्या इतर भागात सुरळीतपणे पसरत आहे.

माझा डोकेदुखीचा त्रास नाहीसा होत आहे, काही क्षणांमध्ये ही बैचेनी दुर होईल!

आणि डोकेदुखी गायब!

प्रत्येक रोगासाठी अशा सुचना तयार करुन त्या अज्ञ मनापर्यत पोहचवुन रोगमुक्त होता येते.

सारांश काय तर मित्रांनो, भावनांची कोंडी करुन जगु नका, रोग बनुन ते शरीराला पोखरतील, राग व्यक्त करा, आणि मोकळे व्हा!

इथे मला एका महापुरुषाचा दृष्टांत आठवतो, त्यांना राग आल्याक्षणी ते कागद घ्यायचे आणि सविस्तर लिहुन काढायचे, मनातले संपुर्ण भाव ओतुन रिते व्हायचे, ते कागद दोन चार दिवस तसेच टेबलवर ठेवायचे आणि नंतर जाळुन किंवा फाडुन टाकायचे.

अशा प्रकारे मनातली सारी खळबळ बाहेर काढुन टाकता येते. आता क्रोधाची भावना नाहीशी होते आणि हलकं हलकं वाटतं.

तुम्हा सर्वांना, निरोगी आणि ठणठणीत आयुष्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा!..

धन्यवाद!

Manachetalks

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “सुप्त मन आणि त्याची शक्ती वापरून आरोग्य कसे सुधारता येईल?”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय