love, लग्न, Divorce : आग का दरिया है, डूब के जाना है !

“मला Divorce घ्यायचाय.” तिने जेंव्हा हे वाक्य घरात उच्चारलं तेंव्हा तिच्या आई-वडिलांना धक्का बसला. तिच्या काही मित्र-मैत्रीणींनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, कारण Divorce घेण्यासारखं काहीच घडलं नाही, असं त्यांचं मत होतं. ती मात्र ठाम होती, तिला कारण देता येत नव्हतं पण ह्या लग्नात आपण आनंदात नाही एवढं मात्र कळत होतं. शेवटी ती ऐकतच नाही म्हटल्यावर तिचा Divorce झाला. कित्येकांच्या मते तिने मूर्खपणा केला होता. “Divorce घ्यायचाच होता तर लग्नच कशाला केलंस?” तिला काहीजणांनी ऐकवलं. “तूच निवडलं होतंस, तुझ्याच इच्छेने झालं होतं सगळं, तुझं प्रेम होतं त्याच्यावर. आधीच विचार करायचास.” ऐकवणारे कमी नव्हते. तिला वाटायचं, “ठीक आहे, चुकली माझी निवड, So What?” तिने जाणीवपूर्वक अशा सल्ले देणाऱ्यांना बाजूला केलं.

ह्या गोष्टीला दहा वर्ष होत आली. तिच्या Divorce च्या निर्णयाचा तिला अजून एकदाही पश्चात्ताप झाला नाही. तिने दुसरं लग्न केलं आणि सुखाने संसारही करते. तिने मला हे सगळं सांगितलं तेव्हा मला तिची बाजू १००% पटली. आज पुन्हा हि गोष्ट आठविण्याचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी एका मुलीच्या बाबतीत अशाच गोष्टी माझ्या कानावर आल्या. इथे मुलीवर नीट संस्कार केले नाहीत असंही सांगितलं गेलं. कारण, तिने एकटीनेच (लग्न न करता) राहण्याचा निर्णय घेतला. हल्ली बरेचदा अशा Divorce च्या घटना कानावर पडतात. त्याचं कारण बरेचदा मुलांना नीट वाढवलं जात नाही, adjust करायला शिकवलं जात नाही, मुलांना हल्ली commitment कळत नाही ह्यावर येऊन थांबतं. का कुणास ठाऊक? पण हे मानायला मन तयार होत नाही.

passion, intimacy आणि commitment हे प्रेमाचे तीन खांब. सिनेमातल्या प्रेमात आणि प्रत्यक्षातल्या प्रेमात फरक असतो तो हाच. प्रत्यक्ष आयुष्यातले प्रेमविवाह आणि ठरवून केलेली लग्नसुद्धा अनेकदा मोडतात. ह्याचं कारण ह्या तीन गोष्टींचा मेळ बसलेला नसतो.

प्रेम आणि त्याबद्दलच्या कल्पना ह्यांत चित्रपटांचा वाटा फार मोठा असतो. आपलं प्रेमपण अगदी हिर-रांझा, लैला-मजनू, राज-सिमरन, आर्ची-परशा सारखंच आहे असं प्रत्येकाला वाटतं. त्याकाळापुरते आपण सिनेमातले हिरो किंवा हिरोईन असतो. सामान्यत: teenage मध्ये प्रेमात पडल्यानंतर ह्या भावना जास्त प्रभावीपणे जाणवतात. प्रेमात पडणं हे खरंतर तेंव्हाच घडतं. १३-१४ वर्षाच्या वयांत मुलांना आणि मुलींना एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागतं. मेंदूमध्ये स्त्रवणारी काही रसायनं (Neurotransmitters) ह्यांत महत्वाची कामगिरी करत असतात. आपल्या हिंदी गाण्यांमध्ये ह्याचं अगदी छान वर्णन केलेलं असतं. प्रेमामध्ये, सर्वत्र प्रिय व्यक्तीचा चेहरा दिसणे, तहान-भूक हरपणे, झोप न लागणे (हा सगळा Neurotransmitters चा परिणाम) इथूनच प्रेमाचा प्रवास सुरु होतो. तहान-भूक हरपत असली तरी प्रेमामुळे भूकबळी गेल्याचं कधी ऐकलं नाही. अर्थात, प्रेमाचा प्रवास इथे सुरु झाला तरी इथेच संपत नाही.

Divorce

बऱ्याचदा, ह्या छान-छान फिलिंगवर भाळून साथ जियेंगे, साथ मरेंगे असं ठरवलं जातं. सुरुवातीचं आल्हाददायक फिलिंग हळूहळू ओसरू लागतं आणि ते ओसरल्यानंतर, “झक मारली अन् प्रेम केलं”, असं म्हटलं जातं. आपल्याला कधी काळी अप्सरा वाटणाऱ्या मुलीचे पुढे आलेले दोन दात चेटकिणीसारखे वाटू लागतात आणि राजबिंड्या (Tall dark & handsom वाटणाऱ्या) मुलाचा काळा रंग आणि अवाढव्य शरीर नजरेस खुपू लागतं. सुरुवातीच्या प्रेमाला ह्याच वेळी आधाराची गरज असते हा आधार असतो intimacy आणि commitment.

अडनिड्या वयांत जेंव्हा प्रेमांत पडून, साथ जियेंगे-साथ मरेंगे अशा आणा-भाका घेतल्या जातात, तेंव्हा त्यामध्ये intimacy चा रोल (बरेचदा) खूप कमी असतो. त्या वयांतच नाहीतर पाहून, दाखवून केलेल्या लग्नांमध्येसुद्धा फक्त passion आणि commitment ह्या दोन खांबांवर डोलारा उभा असतो. वयानुसार शारीरिक ओढ कमी होते आणि फक्त commitment उरते. फक्त commitment वर कितीतरी नाती तग धरून राहतात.

जेंव्हा नातं फक्त commitment वर आधारलेलं असतं तेंव्हा फरफट ठरलेली असते. म्हणूनच, “मी होते म्हणून निभावून नेलं”, हि वाक्यं ऐकायला मिळतात. commitment म्हणजे फक्त एखाद्या स्त्रीशी किंवा पुरुषाशी एकनिष्ठ राहणे नाही. commitment म्हणजे जबाबदारी घेणे. चांगल्या, वाईट क्षणी एकमेकांना जपणे. commitment म्हटलं कि मला नेहमी वाल्ल्या कोळ्याची गोष्ट आठवते. सुखात वाटेकरी होणारे दु:खात वाटेकरी होताना विचार करतात. फक्त आपणच committed आहोत हे कळल्यावर त्याचा संसारातला इंटरेस्टच संपतो. जेंव्हा दोघांपैकी एकच जण commitment पाळत असतो तेव्हा कदाचित कागदोपत्री घटस्फोट होत नसतील, पण संसार सुखाचा नसतो.

Divorce

प्रेमाचा दुसरा खांब म्हणजे intimacy. Intimacy म्हणजे एकमेकांना ओळखणे. खरोखर मनात काय चाललंय हे समजून घेता येणे. intimacy म्हणजे मैत्री. म्हणूनच जेंव्हा नात्यात intimacy असते तेंव्हा मतभेद असले तरी भांडणं नसतात. रुसवा, अबोला ह्यांना जागाच नसते. जेंव्हा intimacy असते तेंव्हा खूप गप्पा होऊ शकतात. intimacy आणि commitment ह्या दोन गोष्टी जेंव्हा एकत्र नांदतात तेंव्हा तो संसार अगदी दृष्ट लागण्यासारखा असतो. असे कितीतरी आजी-आजोबा आपल्याला भेटतात आणि एकमेकांसोबत ते खूप छान दिसतात. intimacy हळूहळू निर्माण करावी लागते. ह्यासाठी दुसऱ्याच्या आवडी-निवडीबद्दल आदर, विचारांबद्दल आदर, आपल्यापेक्षा वेगळं असण्याचा स्वीकार, विश्वास असणे खूप गरजेचे असते. जेंव्हा पार्टनर म्हणून समान विचारांची, समान तत्वांची व्यक्ती निवडली जाते तेंव्हा intimacy लवकर निर्माण होऊ शकते. अर्थात, त्यासाठी पुन्हा कमीटमेंट असावीच लागते.

Intimacy आणि commitment नात्यांत रुजवणं आणि त्याला passionची जोड देणं तसं अवघड काम आहे. तो काय तो, ‘आग का दरिया’ वगैरे तो हाच असावा.

हल्ली मुला-मुलींना (त्यांत मीही आले) हा दरिया पार करणं जमत नाही का? मला वाटतं, पूर्वीही हे फार कमी जणांना जमत असावं. पूर्वी, एकतर मुलीनी-मुलांनी मोठ्यांसमोर बोलणं मान्य नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण सहन करायलाच हवं हि शिकवण दिलेली असे. त्यामुळे बरेचदा नातं सडलं, मनातून मोडलं तरी लोकांसाठी म्हणून जपलेलं असे. आज जेव्हा मुलगा-मुलगी divorceच्या निर्णयापर्यंत पोहोचतात तेव्हा नात्याला ओढत नेण्याला, एखाद्याच्या मागे फरफटत जाण्याला त्यानी नकार दिलेला असतो एवढंच.

आईवडिलानी आपली मते मांडण्यासाठी, मतांवर ठाम राहण्यासाठी जर सक्षम बनविलेलं असेल तर हि एक चांगली गोष्ट म्हणायला हवी. जर एखादी मुलगी स्वतंत्रपणे विचार करून दु:खात कुढत जगण्याऐवजी आनंदाच्या शोधात निघत असेल तर ती जमेची बाजू समजायला हवी. त्यांत तिने नवऱ्याशी committed असायलाच हवं आणि त्याच्याशी सूर जुळत नसले तरी तिथेच राहायला हवं अशी अपेक्षा का?

हल्ली मुलांना आणि मुलींना adjust करायला शिकवलं जात नाही असं नाही, पण एखादी स्वाभिमानी मुलगी किंवा मुलगाही जर स्वत:च्या मूल्यांशी compromise करायला नकार देत असेल, किंवा स्वत:च्या क्षमता ओळखून ह्या पलीकडे आपण adjust होऊ शकणार नाही हे मान्य करत असेल तर त्यांत चूक ते काय?
हा सगळा विचार लग्नापूर्वीच का होत नाही? होतो नक्कीच होतो. पण समजा, काहीवेळेस अंदाज चुकला तर? ते नातं तसंच ओढत राहायचं? हे म्हणजे, जीव जातोय हे समजतंय, किनाऱ्यावर पोचण्यासाठी कुणीतरी दोर टाकलेला दिसतोय पण आपण हातच पुढे करायचा नाही. हाताशी असणारा दोर सोडून द्यायचा आणि बुडायचं. म्हणजे मूर्खपणा नाही का?

लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नक्कीच नाही. म्हणूनच एखादं नातं जर त्रासदायक होत असेल तर वेळीच बाहेर पडायलाच हवं. नात्यात adjustment करावी लागतेच पण adjustment म्हणजे स्वत्व हरवणं नक्कीच नाही. ‘आग का दरिया है, डूबके जाना है’, वगैरे ठीक आहे, पण त्यांत स्वत:ला मरेपर्यंत चटके बसत नाहीत ना, ह्याचा विचार करणे शहाणपणाचे नाही का?

वाचण्यासारखे आणखी काही…

मैत्री….और जिने को क्या चाहिये
ए बॅग ऑफ स्माईल्स!! (A bag of smiles)
हा प्रवास सुखावह करेल तुमचा आशावाद…

मनाचेTalks च्या लेखांबद्दल वाचकांच्या प्रतिक्रिया….


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय