Author: Adv. Haridas Umbarkar
“मनात जितके गुपितं नसतील तितके गुपित आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह केलेले असतात. या गुपितांना एक पासवर्ड टाकला की ते सुरक्षित आहे, असा आपला समज होतो. पण, वरकरणी सेफ वाटणारे हे तंत्रज्ञान किती तकलादू आहे, हे आता समोर येऊ लागले आहे. ‘आपली गोपनीयता आमच्यासाठी महत्त्वाची आहे’ असा टाहो फोडत प्रायव्हसी स्टेटमेंट देणाऱ्या कंपन्यांचीच प्रायव्हसी धोक्यात येत असेल तर आपल्या प्रायव्हसीची काय कथा!”
नैसर्गिक आपत्ती, मृत्यू, अपघात अशा संकटकाळी कोणाताही भेद मनात न ठेवता निव्वळ माणुसकीच्या भूमिकेतून सर्वतोपरी मदत तत्परतेने करणे हे सत्ताधाऱ्यांचे नव्हे तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असते. सांगली, कोल्हापुरातील पूर आपत्तीनंतर राज्यातील सुजाण नागरिकांकडून या कर्तव्यनिष्ठतेचे दर्शन अनेक थरांतून बघायला मिळतेय.
यश ही यशाची पहिली पायरी आहे’ या उक्तीनुसार कमी मार्क हीच तुमची पुढील यशासाठी प्रेरणा होऊ द्या.. लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपण स्वत:साठी काय लक्ष्य ठेवतो, व तिथे पोचतो किंवा नाही यावर आपल्या स्वत:च्या नजरेत आपली यशस्विता असते.
ग्रेटा थनबर्ग या युवतीने काही दिवसांपूर्वी थेट ब्रिटिश संसदेत सरकारची या मुद्यावरून चांगली खरडपट्टी काढली. ब्रिटन पर्यावरण रक्षणासाठी पुरेसे प्रयत्न करत नसल्याची प्रखर टीका ग्रेटाने पुराव्यानिशी केली. वसुंधरा परिषदेला दिलेली वचनेही ब्रिटनने मोडली असल्याचा दावा ग्रेटाने यावेळी केला.
राजकारणात लोकप्रियतेच्या रथावर आरूढ व्हायची मनीषा जवळजवळ सर्वांनाच असते. पात्रता नसणाऱ्यांना तर ती जरा जास्तच.. त्यामुळेच आजच्या राजकारणात ‘वाचाळवीर’ बनून सवंग प्रसिद्धी मिळविणाऱ्यांचाच बाजार जास्त भरलेला दिसतो. काहीही करून चर्चेत राहण्याच्या हव्यासापोटी ह्या वाचाळांच्या जिभा बेतालपणे वळवळत असतात.
चित्रपटसृष्टीमधे सध्या चरित्रपटाची लाट आली आहे. हिंदी असो, मराठी असो कि दाक्षिणात्य फिल्म इंडिस्ट्री असो सगळीकडे ‘बायोपिक’ची धूम सुरु आहे. एकदा प्रयोग रसिकांच्या पसंतीला उतरला आणि व्यावसायिकदृष्ट्या त्याचे फलित समोर आले तर त्या प्रकारचे सिनेमे बनविण्याचा एक ट्रेंडच दिसायला लागतो.
मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी जळत्या निखाऱ्यांवरुन चालणाऱ्या क्रांतीकारांच्या ओठावरचं, कविवर्य कुसुमाग्रज यांनी शब्दबद्ध केलेलं हे गाणं ऐकलं की, डोळ्यासमोर उभे राहतात शाहिद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु. पायाखाली अंगार असताना सुद्धा स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या या तीन युवकांनी उन्मत्त इंग्रजी सत्तेला आव्हान दिले.
चीन आणि पाकिस्तानसारखे विश्वासघातकी देश शेजारी म्हणून लाभले हे भारताचे मोठेच भौगोलिक दुर्दैव आहे. त्यांच्याशी भारताने कितीही चांगले संबंध प्रस्थापित केले.. कशीही जवळीक साधली. तरीही त्यांचं शेपूट काही सरळ होत नाही. एकीकडे मैत्रीचा हात आणि दुसरीकडे घात, हेच या दोन्ही राष्ट्रांच्या परराष्ट्र धोरण राहिलं आहे.
सुटी संपवून ड्युटीवर परतत असणाऱ्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मद च्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. ३५० किलो स्फोटकाने भरलेल्या एसयूव्हीने ताफ्यातील एका बसला धडक मारली. स्फोटामुळे दोन बसच्या चिंधड्या उडाल्या.
संवाद हा प्रत्येक नात्याचा प्राणवायू आहे…. मग ते नातं पालक-पाल्यांचं असो, प्रियकर-प्रेयसीचं असो, नवरा-बायकोचं असो कि मित्र- मैत्रिणीचं. एकमेकांवरचा विश्वास आणि संवादावरच नात्यांची भिस्त असते. संवादा शिवाय नातं फुलतंही नाही आणि बहरतंही नाही.