झुंडशाहीचे बळी..!
रायनपाडा नावाच्या गावामध्ये रविवारी जे काही अमानवीय कृत्य घडलं त्याकडे केवळ ‘घटना’ म्हणून बघता येणार नाही, तर त्यामागे वाढत चाललेली वृत्ती लक्षात घ्यावी लागेल. आज माणूस अधिकाधिक हिंसक आणि क्रूर होत चालला आहे. जणू काही माणसामधील सहनशीलताच संपुष्टात आल्याचं हे चित्र भयावह आहे.