अपंगत्त्वावर मात करून पॅरालिंपिक्समध्ये गोल्ड मेडल मिळवणारे पद्मश्री मुरलीकांत पेटकर
सप्टेंबर १९६५ चा काळ होता. भारत पाकिस्तान युद्धाला सुरवात झाली होती. अश्याच एका रात्री मुरलीकांत पेटकर सियालकोट इकडे आपल्या युनिटसह सकाळच्या साखर झोपेत होते. त्याचवेळी एका पाकिस्तानी सैनिकाने त्यांच्या युनिटवर अंधाधुंद गोळीबार सुरु केला. काय होते आहे कळायच्या आत सगळीकडे अफरातफरी माजली.