विजय दिवस – १९७१ चे भारत पाकिस्तान युद्ध
१६ डिसेंबर १९७१ हा दिवस भारतीय इतिहासाचा एक गौरवशाली साक्षीदार आहे. ह्याच दिवशी जवळपास १ लाखाच्या आसपास (९३,००० हजार) पाकिस्तानी सैन्याने भारताच्या सैन्यापुढे शरणागती पत्कारली. आपल्यासाठी महत्वाचे असणारे दिवस आपण अगदी लक्षात ठेवतो. फ्रेन्डशिप डे, व्ह्यालेनटाईन डे, चॉकलेट डे आणि लिस्ट गोज ऑन. पण ज्यांनी आपल्यासाठी रक्त सांडले त्या सैनिकांना आपण जर त्यांना मानवंदना दिली तर आपण खऱ्या अर्थाने विजय दिवस साजरा केला अस मी म्हणेन.