फोटोंचा बदलता जमाना आणि बदलत्या जमान्यातले आपण!!
फोटो कसा आला ते कळायला काही मार्गच नसायचा. फोटो जेव्हा धुवून येतील तेव्हा कळायचं आपण नक्की काय बंदिस्त केल. त्यात कोणाचं डोक कापलं की कोणाचा हात! लहानपणी आपल्या आठवणी कुठेतरी सांभाळून ठेवणे हे दुय्य्म असायचं. कोणताही क्षण मनसोक्त जगून त्याची मज्जा घेऊन मग कधीतरी आठवण झाली तर त्या जपवून ठेवाव्या अस वाटायचं. एखाद भावंड, कुटुंब, किंवा मित्र – मैत्रिणींचं गेट टू गेदर असून दे अथवा मे महिन्याची किंवा दिवाळीची सुट्टी असू दे. सगळ्यात महत्वाचं काही असेल तर ते क्षण अनुभवणं.