“होळी”
आज शंकर खूष दिसत होता. त्याचे कारण आम्हा सर्वाना माहीत होते. होळी जवळ आली की शंकर गावी जायच्या कल्पनेनेच खुश असायचा. नेहमीप्रमाणे त्याने आधीच रजा मंजूर करून घेतली होती. अर्थात नाही केली असती तरीही तो बिनपगारी रजा घेऊन गेला असता याची खात्री होतीच.