रहस्य भाग- ४ ( रूपकुंड )
बर्फात झाकलेल्या तळ्याच्या खाली काही सांगाडे त्यांना त्याकाळी दिसले होते. उन्हाळ्यात तळ्याचं पाणी आटल्यानंतर अजून काही सांगाडे त्यांच्या दृष्टीस पडले. त्या काळात ब्रिटीशांनी हे सांगाडे जापनीज लोकांचे असतील असा समज केला. दुसऱ्या महायुद्धात ह्या बाजूने जाताना हिमवर्षाव अथवा कोणत्यातरी नैसर्गिक आपत्ती मध्ये जापनीज लोक इकडे गाडले गेले असतील असा अंदाज त्यांनी केला व ह्याकडे दुर्लक्ष केल.