कर भला तो हो भला : कन्हैयालाल
कोणत्याही कलेचा भूंगा एकदा का डोक्यात गेला की तो मेंदू सतत कुरतडत असतो. पंडित चौबेजीच्या एका मुलाने मुंबईची वाट धरली मग या दुसऱ्याला कसे बांधून ठेवणार? सुरूवातील किराणा दुकानात बसवून बघितले पण याच्या डोक्यात वेगळेच “किराणा” घराणे !!! नाटक, संगीत, लिखाण या त्रयीने याचा ताबा घेतला. “पंधरह अगस्त्” या नावाचे एक नाटक लिहून त्याने ते बसवले.