जिथे लग्नानंतर कौमार्य चाचणी होऊन मुलगी खराब असल्याचा शिक्का लावला जातो
यथावकाश हा मुलगा मोठा झाला तसा आपल्या समाजातल्या लग्नांना समजून घ्यायला त्याने सुरुवात केली. त्याने पाहिलं कि लग्नातले मंगल अष्टका वगैरे सोस्कर झाले कि नवरदेव नवरीला एका चादरीवर बसवतात. आणि कंजारभाट समाजाची जातपंचायत त्यांना घेरून बसते. सर्वांसमोर मुलीच्या घरच्यांना मुलीला काही आजार आहे का? यासारखे प्रश्न विचारले जातात.