पालकत्वाच्या शाळेतील हे पहिले-वहिले धडे: या रागाचे करायचे तरी काय?
राग येणं ही एक नैसर्गिक भावना आहे पण आपल्याला राग आल्यानंतर आपण त्याच्या किती प्रमाणात आहारी जातो.. त्यात वाहवत जाऊन स्वतःला किंवा इतरांना नुकसान करणारी कृती करून बसतो. हे आपल्या हातात असतं. रागाला आपण किंवा आपल्या जवळचे इतर लोकं कसा प्रतिसाद देतात त्यावर पुढच्या वेळी पुन्हा ते हत्यार वापरायचं की नाही हे ठरतं.