नकारात्मक घटना घडत असतील तर काय करायचं? (प्रेरणादायी लेख)
आपण बस पकडायला चाललो तर पहिला विचार ‘बहुतेक भेटणार नाही आता..!!’ असाच येतो. एखाद्या उंच डोंगरकड्यावर चढलो आणि खाली पाहिले कि ‘इथून पडलो तर!!’ असा विचार गरज नसताना बहुतेकांच्या मनात डोकावतो. अर्थात, अशा विचारांची काही गरज आहे का? पण ते माणसाच्या मनात उत्पन्न होतात आणि त्यामुळे मानवाची सकरात्मक ऊर्जा खर्च होते.