असंवेदनशीलतेचा ‘महा’ पूर!
नैसर्गिक आपत्ती, मृत्यू, अपघात अशा संकटकाळी कोणाताही भेद मनात न ठेवता निव्वळ माणुसकीच्या भूमिकेतून सर्वतोपरी मदत तत्परतेने करणे हे सत्ताधाऱ्यांचे नव्हे तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असते. सांगली, कोल्हापुरातील पूर आपत्तीनंतर राज्यातील सुजाण नागरिकांकडून या कर्तव्यनिष्ठतेचे दर्शन अनेक थरांतून बघायला मिळतेय.