आई-वडील एकाच मुलाच्या नावे बक्षीसपत्राने प्रॉपर्टी हस्तांतरित करू शकता का?

सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: बक्षीस पत्र कायदा । वडिलोपार्जित जमिनीचे बक्षीस पत्र करता येते का?। बक्षीस पत्राने झालेले हस्तांतरण ग्राह्य धरले जाते का? । वडिलोपार्जित संपत्तीवर नेमका कोणाचा अधिकार असतो? । अशा संपत्तीतील आपला अधिकार डावलला जात असेल तर नेमकी काय करावे?

कोणतीही मालमत्ता म्हणजेच प्रॉपर्टी ही त्या-त्या कुटुंबाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असणारी गोष्ट असते.

सर्वसाधारणपणे आई-वडिलांकडून त्यांची मालमत्ता त्यांच्या मुलांना आणि पुढे त्यांच्या मुलांना अशा पद्धतीने हस्तांतरित होत असते.

बहुतांश वेळा मालमत्तेचे हस्तांतरण हे बक्षीस पत्र करून केले जाते. म्हणजेच आधी मालमत्ता ज्यांच्या नावावर आहे अशा व्यक्तीने बक्षीस पत्र करून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या नावावर मालमत्ता हस्तांतरित करणे.

असे बक्षीस पत्र म्हणजेच गिफ्ट डिड जर रजिस्टर केले असेल तर या पद्धतीने हस्तांतरित केलेल्या मालमत्तेवर कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही.

परंतु याचा अर्थ असा आहे का, की वडिलोपार्जित असणारी मालमत्ता देखील अशा पद्धतीने कोणा एकाच व्यक्तीच्या नावावर करता येईल?

तर असे मात्र नाही. एखाद्या कुटुंबाकडे असणारी वडीलोपार्जित मालमत्ता त्या कुटुंबाचा प्रमुख पुढील पिढीतील कोणाही एकाच्या नावावर हस्तांतरित करू शकत नाही.

ती मालमत्ता पुढच्या पिढीतील सर्व कुटुंबीयांना समान पद्धतीने मिळणे कायद्याने आवश्यक आहे.

यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. एखाद्या गावात विनायकराव नावाचे सधन शेतकरी आहेत. त्यांच्या नावावर त्यांच्या वडिलांनी घेतलेली भरपूर जमीन, तसेच त्यांच्या वडिलांनी बांधलेला मोठा वाडा आहे.

विनायक रावांना रमेश आणि सुरेश असे दोन मुलगे असून रमेश हा त्यांच्या जवळच राहून शेती बघतो तर सुरेश हा शहरात राहून नोकरी करतो.

रमेश नेहमी शेतीचे काम बघतो असा विचार करून जर विनायक रावांनी बक्षीस पत्राने सगळी जमीन आणि राहता वाडा रमेशच्या नावावर करून दिला तर ते योग्य होणार नाही.

कारण सुरेश हा देखील सदर संपत्ती वडिलोपार्जित असल्यामुळे त्या संपत्तीचा हिस्सेदार आहे. अशा वेळी सुरेश सदर मालमत्तेवर दावा सांगू शकतो.

जर एखादी संपत्ती एखाद्या व्यक्तीने संपूर्णपणे स्वतः कमावलेली असेल म्हणजेच ती मालमत्ता त्या व्यक्तीची स्वकष्टार्जित असेल तर त्या मालमत्तेचे स्वतःला हवे त्या प्रकारे हस्तांतरण करण्याचा सदर व्यक्तीला संपूर्ण अधिकार असतो.

परंतु वर पाहिलेल्या उदाहरणातील सगळी जमीन आणि वाडा जर विनायकरावांच्या वडिलांनी कमावलेला आहे तर विनायक रावांना तो आपल्या मुलांपैकी एकालाच देण्याचा कोणताही अधिकार नाही.

जर विनायक रावांनी बक्षीस पत्राद्वारे रमेशला मालमत्ता हस्तांतरित करून दिली तर सुरेशला त्याबाबत काय करता येईल ते आपण पाहूया.

अशावेळी सुरेशने दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून संपूर्ण व्यवहाराची माहिती तसेच मालमत्तेची संपूर्ण माहिती कोर्टाला सादर करावी आणि कोर्टाच्या हस्तक्षेपाने सदर वडिलोपार्जित मालमत्तेचे योग्य प्रकारे वाटप दोन्ही भावांमध्ये व्हावे अशी मागणी करावी.

विनायक रावांची मालमत्ता नेमकी वडिलोपार्जित आहे अथवा स्वकष्टार्जीत?

मालमत्तेचा किती भाग त्यांनी स्वतः कमावलेला आहे व किती वाडीलोपार्जित आहे या सर्व बाबींचा योग्य तो विचार करून दिवाणी न्यायालयात कोर्टाद्वारे सदर मालमत्तेचे योग्य ते वाटप केले जाते.

जर मालमत्तेचे बक्षीस पत्राने झालेले हस्तांतरण आधीच झालेले असेल आणि त्यामुळे मालमत्तेच्या सातबारा उताऱ्यामध्ये जर काही फेरफार झाले असतील, तर आधीचे फेरफार रद्द करण्यासाठी आणि नव्या पद्धतीचे फेरफार त्यात समाविष्ट करण्यासाठी आणखी एक अर्ज करावा लागतो.

तसे केल्यामुळे आधी झालेला व्यवहार रद्द ठरवून नवीन पद्धतीने झालेले मालमत्तेचे हस्तांतरण ग्राह्य धरले जाते आणि त्यानुसार आवश्यक ते फेरफार केले जातात.

याचाच अर्थ असा की स्वतः कमावलेली प्रॉपर्टी एखादी व्यक्ती आपल्या इच्छेप्रमाणे कोणालाही देऊ शकते परंतु आपली वडीलोपार्जित प्रॉपर्टी किंवा मालमत्ता कोणा एकालाच देऊन टाकण्याचा अधिकार त्या व्यक्तीला नसतो तर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील पुढच्या पिढीतील सर्व व्यक्ती त्या प्रॉपर्टीचे वाटेकरी असतात.

केवळ बक्षीसपत्र केले म्हणून मालमत्ता हस्तांतरित होत नाही. अशावेळी कोर्टाच्या मदतीने इतर व्यक्तींना आपला हक्क प्राप्त करून घेता येतो.

यासाठी अर्थातच उत्तम वकिलांचा सल्ला घेणे आणि योग्य मार्गानेच कायदेशीर कारवाई करणे अतिशय आवश्यक ठरते.

मित्र-मैत्रिणींनो, आजच्या लेखातील ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा.

तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी हा लेख शेअर करायला विसरू नका. तसेच ह्याबाबतीतले तुमचे अनुभव आम्हाला नक्की लिहून कळवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय