वजन कमी करण्याचे उपाय – तथ्य किती, अफवा किती!

सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: झटपट वजन कमी करणे | वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे | छाती कमी करण्यासाठी घरगुती उपाय |वजन कमी करण्यासाठी गोळ्या | कंबर कमी करण्याचे उपाय

वजन कमी करण्यासाठी काय खावे, पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहार कसा असावा, वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे आहेत का असे प्रश्न पडले असतील तर हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण वजन कमी करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला काय असू शकतो हे सुद्धा आता आपण इंटरनेटवर शोधतो!!

जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी सांगितले जाणारे विविध उपाय योग्य असतात की निव्वळ अफवा!

वजन कमी करायचं म्हटलं की वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळे सल्ले मिळायला सुरुवात होते. परंतु यातले सगळेच उपाय खरंच उपयुक्त असतात की काही उपाय म्हणजे निव्वळ अफवा असतात हे जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

वजन कमी करण्यासाठी सहसा सांगितले जाणारे वेगवेगळे उपाय खरोखरच उपयोगी असतात का यावर आज आपण चर्चा करणार आहोत.

वजन कमी करण्यासाठी सहसा खालील उपाय सांगितले जातात.

१. फॅट्स किंवा चरबीयुक्त पदार्थ संपूर्ण बंद करा.

वजन कमी करायचे म्हटले की सगळ्यात आधी दिला जाणारा सल्ला म्हणजे चरबीयुक्त पदार्थांचे सेवन पूर्णपणे बंद करा. आहारातून तेल, तूप इत्यादी घटक पूर्णपणे वजा करा म्हणजे तुमचे वजन निश्चितपणे कमी होईल.

परंतु असे करणे योग्य नाही. संतुलित प्रमाणात चरबीयुक्त पदार्थांचे सेवन आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते. आहारातून तेल आणि तूप संपूर्णपणे वजा करणाऱ्या लोकांमध्ये पक्षाघाताचा विकार आढळून येतो. तसेच आरोग्याच्या इतरही तक्रारी दिसून येतात.

आहार तज्ञ असे सांगतात की योग्य प्रमाणात शुद्ध तेल आणि घरी बनवलेले शुद्ध तूप आपल्या आहारात अवश्य असावे. मात्र ज्याला ट्रान्सफॅट असे म्हणतात असे फॅट्स असणारे पदार्थ उदाहरणार्थ बिस्किटे, केक, वारंवार तळले गेलेले पदार्थ, फ्रोजन पदार्थ मात्र मुळीच खाऊ नयेत.

आहारातील तेलातुपाची मात्रा संतुलित ठेवून घरी बनवलेले ताजे सकस अन्न नियमितपणे खाल्ल्यास वजन निश्चितपणे कमी होऊ शकते.

२. आहारातील कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी करा.

वजन कमी करण्यासाठी दुसरा सल्ला दिला जातो तो म्हणजे आहारातील कार्बोहायड्रेट कमी करा. परंतु भारतीय पद्धतीचे जेवण जर आपण लक्षात घेतले तर आपल्या जेवणात भात, पोळी, भाकरी अशासारख्या कार्बोहायड्रेट्स युक्त पदार्थांना तितकेच महत्त्व आहे जितके इतर प्रोटीन युक्त पदार्थ जसे की डाळ, मांसाहार आणि भाज्या यांना आहे. त्यामुळे आपल्या आहारातून कार्बोहायड्रेट्स संपूर्णपणे बंद करणे किंवा अतिशय कमी प्रमाणात त्यांचे सेवन करणे खरे तर आपल्या आरोग्याला घातकच ठरू शकते.

इथेच भारतीय आहार पद्धती कशी योग्य आहे हे जाणवते. योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट घेणे शरीराला ऊर्जा प्राप्त करून देते त्यामुळे त्याचे सेवन पूर्णतः बंद करू नये. आहारातील प्रोटीन आणि कार्बस् यांचे संतुलन योग्य ठेवावे.

३. आहार कमी करा किंवा उपास करा.

वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डायट करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामध्ये दिवसातून एकदाच खाणे, केवळ द्रव पदार्थ घेणे, फक्त फळे खाणे, दोन खाण्यांमध्ये 16 किंवा 24 तासांचे अंतर ठेवणे अशा प्रकारचे उपास करण्याचा सल्ला दिला जातो.

परंतु खरे तर अनेक तास काही खाल्ले नाही तर शरीराला अन्नपुरवठा न झाल्यामुळे शरीराची अशी समजूत होते की आहे ती ऊर्जा जपून ठेवण्यासाठी शरीरातील चरबी साठवून ठेवली पाहिजे.

त्यामुळे खरे तर वजन कमी न होता उलट ते वाढू लागते. म्हणूनच अनेक तास उपाशी राहण्याऐवजी ठराविक वेळेला हलका, पौष्टिक आहार घेणे, त्या आहारात फास्ट फूड आणि जंक फूडचा समावेश न करणे असे करणे अधिक योग्य ठरेल.

वजन कमी करण्यासाठी इंटरमिटंट fasting चा काही प्रमाणात उपयोग होतो परंतु त्यामध्ये अचानक केस गळू लागणे, त्वचा निस्तेज बनणे, अंगातील शक्ति कमी होणे असे तोटे देखील आढळून येतात. त्यामुळे असे उपाय करताना बरोबरीने योग्य ते विटामीन supplements घेणे आवश्यक आहे.

४. खूप व्यायाम करा.

उत्तम आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे अतिशय आवश्यक आहे ही गोष्ट अगदी शंभर टक्के बरोबर आहे. परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक मात्र निश्चितच चांगला नसतो.

शरीर थकवणारा, अनेकानेक तास करण्याचा व्यायाम शरीराला हानी पोहोचवू शकतो. शरीरातील स्नायूंचे नुकसान होऊ शकते.

योग्य प्रमाणात, आपल्या शरीराला झेपेल असा दिवसातून किमान 45 मिनिटे व्यायाम करणे हे उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. नियमितपणे असा व्यायाम केल्यास वजन हळूहळू निश्चितपणे कमी होते.

खूप जास्त व्यायाम आणि अतिरेकी पद्धतीचे डायट केल्यामुळे जरी वजन खूप उतरले तरी ते बाउन्स बॅक होते म्हणजेच पुन्हा वाढते असा अनुभव खूप लोकांना येतो. त्यामुळे अचानक वीस पंचवीस किलो वजन कमी करणे असे न ठरवता हळूहळू दोन चार सहा किलो वजन उतरवणे जास्त फायदेशीर ठरते. हळूहळू वजन उतरवल्यामुळे शरीराला देखील त्याची सवय होते आणि शरीर नव्या वजनाशी योग्य रीतीने जुळवून घेऊ शकते.

५. आहारातून साखर पूर्णपणे बंद करा.

साखर हा पदार्थ संपूर्णपणे कॅलरीज युक्त आहे ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे साखर अथवा गोड पदार्थांचे अतिरेकी सेवन सुरू ठेवल्यास वजन वाढते, तसेच ते कमी होण्यात अडथळा निर्माण होतो हे देखील खरे आहे. परंतु याचा अर्थ वजन कमी करत असताना साखरेचे सेवन संपूर्णपणे बंद करणे असा होत नाही.

अगदी थोड्या प्रमाणात साखरेचे सेवन करणे हे शरीराला ऊर्जा देण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे आपल्या प्रकृतीनुसार, तसेच आपण करत असलेल्या व्यायामा नुसार आपण किती गोड अथवा साखरयुक्त पदार्थ खाऊ शकतो हे प्रत्येकाने ठरवावे. परंतु साखर संपूर्णपणे बंद मात्र करू नये.

तर या आहेत अशा बाबी ज्या वजन कमी करण्यासाठी हमखास सांगितल्या जातात परंतु त्या तितक्याशा खऱ्या नाहीत.

खरे तर, घरी बनवलेले ताजे आणि सकस अन्न खाणे, बाहेरचे पदार्थ खाण्याचे प्रमाण अतिशय कमी ठेवणे, सतत तळलेले आणि पिष्टमय पदार्थ न खाणे, फास्ट फूड आणि जंक फूड चे सेवन अगदी नगण्य प्रमाणात करणे आणि या सगळ्याच्या जोडीला सुयोग्य व्यायाम नियमितपणे करणे असे करण्यामुळे आपण आपले वजन निश्चितपणे आटोक्यात ठेवू शकतो.

शिवाय धूम्रपान आणि मद्यपान न करणे वजन आटोक्यात ठेवण्यास तर मदत करतेच शिवाय शरीराचे एकूण आरोग्य चांगले राहण्यास फायदेशीर ठरते.

तर मित्र-मैत्रिणींनो, या लेखात सांगितलेल्या उपायांचा वापर करून आपले वजन आटोक्यात ठेवा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख नक्की शेअर करा. तसेच वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोणकोणते उपाय करता हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. स्वस्थ रहा आनंदी राहा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय