मंगळस्वारी असो कि चंद्राची वारी इस्रो मधली नारीशक्ती जगात भारी!!

२०१४ साली भारताच्या यशस्वी मंगळ स्वारी नंतर पूर्ण जगाचं लक्ष भारताकडे वळालं होतं. खास करून जगातील अग्रगण्य अवकाश संस्था आणि त्यातले वैज्ञानिक. भारत मंगळाच्या कक्षेत आपलं यान प्रक्षेपित करू शकतो ही गोष्टच त्यांना पचायला जड जात होती. ह्या वेळेस इस्रो च्या कमांड सेंटर मधील एका फोटोने पूर्ण जगभरात सगळ्याचं लक्ष वेधलं. तो फोटो होता इस्रो च्या नारी शक्तीचा. भारतीय संस्कृतीचं प्रतिक असलेल्या साड्या घालून अगदी केसात गजरा माळून मंगळयान मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त करताना इस्रो च्या स्त्री वैज्ञानिकांना बघून पूर्ण जग अवाक झालं होतं. चूल आणि मुल ह्यात अडकलेली भारतीय नारी भारताच्या मंगळ मोहिमेत आपला सिंहाचा वाटा उचलताना बघून पूर्ण जगाने तोंडात बोटे घातली होती.

चंद्रयान २

एकेकाळी सापांच्या जादू करणारा देश कसा काय मंगळावर पहिल्याच प्रयत्नात पोहोचतो? हे जेवढं जगासाठी धक्कादायक होतं तितकचं धक्कादायक साडी घातलेली भारतीय स्त्री ह्या मिशन मध्ये मोलाची भूमिका बजावते हे होतं. ह्या नंतर जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्णतः बदलून गेला.

२०१४ च्या मोहिमेनंतर पुन्हा एकदा इस्रो एका नव्या मोहिमेसाठी सज्ज होतं आहे. ‘चंद्रयान २’ हे इस्रो च्या इतिहासातलं सगळ्यात कठीण मिशन मानलं जातं आहे. आजवर इस्रो पृथ्वीच्या, चंद्राच्या आणि मंगळाच्या कक्षेत आपलं यान / उपग्रह पाठवण्यात यशस्वी झाली आहे. पण ह्या वेळेस पहिल्यांदा इस्रो एका वेगळ्या ग्रहावर यान उतरवणार आहे.

चंद्रयान २

एखाद्या ग्रहाभोवती त्याच्या कक्षेत यान प्रक्षेपित करणं सोप्प पण तेच यान त्याच्या पृष्ठभागावर उतरवणं हे तितकचं कठीण आहे. एखाद्या ग्रहावर यान / रोवर उतरवण्यासाठी अनेक गोष्टींचा अभ्यास गरजेचा आहे. त्या ग्रहाच्या वातावरणाची अचूक माहिती, तिथल्या वातावरणाचा दाब, स्थिती, तपमान ते उतरवण्याची जागा ह्या सोबत इतर अनेक गोष्टींचा प्रचंड अभ्यास करावा लागतो. प्रत्येक गोष्टीचं गणित एक दोन वेळा नाही तर हजारवेळा करावं लागतं. एक चूक आणि होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. चंद्राच्या बाबतीत बोलायचं झाल्यास ह्या वर्षाच्या सुरवातीला इस्राईल च्या यानाला चंद्रावर उतरताना अपयशाला सामोर जावं लागलं कारण खूप काही अश्या गोष्टी आहेत ज्याचं नियंत्रण आपल्याला पृथ्वीवरून करावं लागतं तर काही गोष्टी तिथल्या कॉम्प्यूटर ने योग्यरित्या करणे गरजेचे असते.

चंद्रावर उतरण्यासाठी लागणारं डीप स्पेस नेटवर्क आणि चंद्राच्या वातावरणाशी जुळवून घेणारी यंत्रणा निर्माण करणं कठीण होतं त्यामुळे इस्रो च्या ह्या मिशन ला अनेकवेळा पुढे ढकलावं लागलं आहे. चंद्रावर यान उतरवणं ज्याला वैज्ञानिक भाषेत सॉफ्ट लँडिंग म्हणतात ते आजवर इस्रो पहिल्यांदा करत आहे. ज्या भागात इस्रो आपलं यान उतरवत आहे त्या भागात आधी कोणत्याच राष्ट्राचं यान उतरलेलं नाही. चंद्रयान २ चं सगळं वजन ३.८ टन ( ३८०० किलोग्राम ) आहे. इस्रो चं जी.एस.एल.व्ही. मार्क ३ रॉकेट पहिल्यांदा इतकं वजन घेऊन अवकाशात उड्डाण करणार आहे. तब्बल १००० कोटी रुपयांची अतिशय खडतर अशी मोहीम यशस्वी करण्याचं शिवधनुष्य इस्रो ने भारताच्या नारीशक्ती वर सोपवलेलं आहे.

चंद्रयान २

एम.वनिथा ह्या मिशन च्या प्रोजेक्ट डायरेक्टर असणार असून रितू करीढाल ह्या मिशन डायरेक्टर असणार आहेत. एम. वनिथा ह्या इस्रो च्या पहिल्या महिला प्रोजेक्ट डायरेक्टर असणार असून २००६ साली त्यांना एस्ट्रोनॉमीकल सोसायटी ऑफ इंडिया च्या “बेस्ट वुमन” सायंटीस्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तर रितू करीढाल ह्या भारताच्या “रॉकेट वुमन ऑफ इंडिया” म्हणून ओळखल्या जातात. त्यांना ही २००७ साली “यंग सायंटीस्ट” पुरस्कार डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम ह्यांच्या हस्ते मिळालेला आहे. त्यांच्या निवडीबाबत सांगताना के.शिवन ह्यांचे शब्द खूप काही सांगून जातात,

We only look at the most fit person for the job, and it so happened that it was women here. It didn’t make difference for us. In fact, 30% of the chandryaan 2 team are women.

इस्रो डायरेक्टर के. शिवन म्हणतात…

ज्या देशात स्त्री म्हणून आजवर अनेक ठिकाणी पुरुषसत्ताक समाजाकडून डाववलेल्या गेलेल्या अनेक संधीसाठी स्त्री लढा देते आहे. त्याच भारत देशात भारताच्या अवकाश इतिहासातील सगळ्यात खडतर आणि सगळ्यात महत्वाकांक्षी मोहिमेसाठी दोन स्त्रियांची निवड ही त्यांच्या कर्तुत्वावर होते हा बदल खूप मोठा आहे असं मला मनापासून वाटतं. चंद्रयानातील लँडर आणि रोव्हर वर भारतीय तिरंगा असणार आहे तर रोव्हर च्या चाकांच्या एका बाजूला अशोकचक्र तर दुसऱ्या बाजूला इस्रो चा लोगो असणार आहे. जवळपास ६२० पेक्षा जास्त भारतीय विद्यापीठ, कंपनी, प्रयोगशाळा यांनी त्याचं योगदान ह्या मोहिमेसाठी दिलं आहे. ह्या सगळ्यांच्या तसेच १३० कोटी भारतीयांच्या चंद्रावर तिरंगा फडकवण्याच्या स्वप्नाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी भारताच्या दोन स्त्रिया उचलत आहेत. ही सगळ्याच भारतीय स्त्रियांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.

जेव्हा चंद्रयान २ चंद्रावर उतरेल तेव्हा भारताने एक असा पल्ला पार केला असेल ज्याचं स्वप्न पण कोणत्याच भारतीयाने ५० वर्षापूर्वी बघितलेलं नसेल. हे स्वप्न पूर्णत्वाला नेण्याचं श्रेय त्याच साड्या घातलेल्या, गजरा माळलेल्या स्त्रियांकडे असेल तेव्हा नारीशाक्तीचा तिरंगा मोठ्या डौलाने चंद्रावर फडकेल.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीकिंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय